Wednesday, March 23, 2022

मीना कुमारी जेंव्हा खुनभरी स्वाक्षरी देते

 

 

अभिनेते, अभिनेत्र्या यांचं वेड आम सगळ्यांनाच असतं. आपापल्या लाडक्या कलाकाराच्या प्रेमात वेडे लोक त्यांच्यासारखं दिसण्या बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे फ़ोटो जमा करतात आणि अगदीच नशिबानं साथ दिली तर भेटून स्वाक्षरीही घेतात. मात्र कधी कधी या कलाकारांना आपल्या फ़ॅन्सचे असे काही अनुभव येतात की ते त्यांच्या आयुष्यभर लक्षत रहातात. सत्तरच्या दशकातील ट्रॅजिडी क्विन म्हणून लौकीक मिळविलेली अभिनेत्री मीना कुमारी. अत्यंत तरल असा अभिनय आणि शालीन सौंद्य अशी जिची ओळख होती ती मीना कुमारी लाखो दिलो की धडकन होती. तिची एक झलक मिळावी म्हणून तिचे चाहते तळमळत असत. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असे. मात्र एक अनुभव असा आला की त्यानं मीना कुमारीचा थरकाप उडाला. एका डाकू फ़ॅननं मीना कुमारीकदे अशी मागणी केली की मीना कुमारीच काय उपस्थित क्रु मेंबर्सनाही घाम फ़ुटला.

त्याचं झालं असं की, मीना कुमारी त्या काळात कमाल अमरोहींच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. त्यांच्याच पाकिजामधे कामही करत होती. पाकिजाच्या मेकिंगची चर्चा त्या काळात जोरदार होती. या चित्रपटाच्याच शुटिंगसाठी सगळं युनिट कुप्रसिध्द मध्य प्रदेशातील शिवपूरी भागात गेले होते. त्या काळात चंबळ मधील डाकूंनी नुसता धुमाकूळ घातला होता. अनेक क्रूर डाकू या भागात कार्यरत होते आणि त्यांच्या क्रुरतेच्या कहाण्यांनी वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरले जात होते. शहाणा माणूस या भागातून रात्रीचा प्रवासच काय पण दिवसाचा प्रवासही शक्यतो टाळत असे. या खोर्‍यात डाकूंच्या तावडीत सापडणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण बनलं होतं.

मीना कुमारी, कमाल अमरोही आणि काही क्रू मेंबर्सना शुटिंग संपवून मुंबईला परतताना रात्र झाली. कुप्रसिध्द चंबळच्या खोर्‍यातून जात असतान कधी एकदा या टापूतून बाहेर पडतोय असं प्रत्येकाला झालेलं होतं. मात्र नियतीनंच ती रात्र मीना कुमारीसाठी विचित्र रात्र म्हणून आधीच नोंदवून ठेवली होती. पुढे जे घडणार होतं ते भूतो न भविष्यती असं असणार होतं. दोन कारमधून ही मंडळी चाललेली असतानाच अचानक बियाबान भागात आल्यावर कारमधलं पेट्रोल संपलं आणि रस्त्याकडेला गाड्या थांबवल्या गेल्या. इतक्या रात्री पेट्रोल शोधायला जाणं म्हणजे डाकूंना आपणहोऊन आमंत्रण दिल्यासारखं होणार होतं. म्हणून कमालजींनी निर्णय घेतला की, गाड्या रस्त्याकडेला थांबवून मुंबईला जाण्याची काही सोय होतेय का बघायची. विचारविनिमय चाललेला असताना अचानकपणे डाकूंनी त्यांना घेरलं. कारमधल्या प्रत्येकाचं धाबं दणाणलं. आजूबाजूला बंदूकीचा निशाणा धरलेले डाकू आणि आता यातून सुटका नाही ही जाणीव झालेले कमालजी. खिडक्यांच्या काचा ठोठावत सगळ्यांना बाहेर येण्याविषयी सांगितलं जात होतं. कमालजिंनी धैर्य गोळा करत त्यापैकी एका डाकूला सांगितलं की तुझ्या सरदाराला मला येऊन भेटायला सांग. त्यांनी हे सांगताच याच घेरावातून एक सामान्य उंचीचा आणि रेशमी कुर्ता सलवार घातलेला एक इसम पुढे आला. त्यानं कमालजींना विचारलं,” तुम कौन हो?” कमालजींनी त्याला सांगितलं की,” मैं कलाम अमरोही हूं और मै चंबल शूटिंग करने आया हूं” शुटिंग हा शब्द ऐकताच तो इसम संतापला. तो कमालजींना पोलीस समजला आणि शूटिंग म्हणजेच डाकूंना मारायला हा पोलिसवाला आला आहे असा त्याचा समज झाल्यानं तो रागात बोलू लागला. कमालजींच्या लक्षात आलं की समोरच्या इसमाचा काही गैर्समज झालेला आहे. त्यांनी तातडीनं खुलासा केला की, शूटींग म्हणजे चित्रपटाचं शूटिंग. हे ऐकून तो इसम शांत झाला. कमालजींनी थोडं धाडस गोळा करत त्या इसमाला विचारलं की तुम्ही कोण आहात? यावर त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांची भितीनं दातखिळ बसायची वेळ आली. या डाकूचं नाव होतं, डाकू अमृत लाल. त्या काळात अमृत लाल त्याच्या कारनाम्यांमुळे सतत बातम्यांत असायचा. त्याच्या क्रुरतेला सीमाच नव्हती. आता कमालजींकडे त्यानं अधिक चौकशी सुरू केली. कोणता चित्रपट, कलाकार कोण? मग त्याला कळलं की या चित्रपटात मीना कुमारी काम करत असून आत्ता या क्षणी ती तिथे उपस्थित आहे. झालं! तो इसम आनंदानं वेडा झाला कारण तो मीना कुमारीचा प्रचंड मोठा चाहता होता. त्यानं हट्टच धरला की त्याला मीना कुमारीला भेटायचं आहे. काही झालं तरी डाकूच तो, त्याला भेटायला मीना कुमारी राजी होईना. मात्र अमृत लालनं सांगितलं की, जर का त्याला मीना कुमारि भेटली तर तो सर्वांना पुढच्या प्रवासाला जाऊ देईल. अखेर क्रु मेंबर्सचा विचार करत मीना कुमारी या भेटीला तयार झाली. अमृत लाल आनंदानं अक्षरश: वेडा झाला. त्यानं या मंडळींच्या खानपानाची व्यवस्था केली आणि दरम्यान गाड्यांमधे पेट्रोल भरण्याची व्यवस्था केली. अमृतलालकडचा पहुणचार घेऊन मंडळी निरोप घेऊन निघाली. प्रत्येकाच्याच मनात सुटलो बुवा अशी भावना असतानाच अमृतलालचं डोकं पुन्हा फ़िरलं. आता त्याला मीना कुमारीची स्वाक्शरी हवी होती. ती द्यायला खरंतर मीना कुमारीची काहीच हरकत नव्हती पण डाकूला हवी असणारी स्वाक्षरी सामान्य कशी असेल? अमृतलालनं सुरीनं मीना कुमारीनं तिचं नाव स्वत:च्या हातानं अमृतलालच्या हातावर कोरावं अशी त्याची इच्छा होती. कधी कोणावर चढ्या आवाजातही न बोलणार्‍या मीना कुमारीला हे करणं म्हणझे साक्षात ब्रम्हांड आठवणारं होतं. तिनं नकार दिला मात्र डाकू हट्टालाच पेटलेला. अखेर मीना कुमारीनं कशीबशी हिंमत करुन हे कामही पार पाडलं आणि सगळ्या क्रु मेंबर्सची सुटका केली. स्वाक्षरी घेऊन अमृतलाल खुष झाला आणि क्रु मेंबर्स गाडीत बसून वेगात गाडी दामटवत मुंबईच्या दिशेने निघाले.


आजच्या पोस्टसाठी जो व्हिडिओ जोडलेला आहे तो मीनाकुमारी यांनी फ़ौजी भाईयों के लिए सादर केलेल्या जयमाला कार्यक्रमाचा आहे. मीना कुमारी यांचा आवाज यात ऐकायला मिळेल.

[लेख पूर्वप्रसिध्दी inmarathi]

#meenakumari#jaymala#oldhindisongs#dilekmandir



 

No comments: